विरारमध्ये मृत्यूचे तांडव

नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात ५ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली असून वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.

First Published on: April 23, 2021 3:52 PM
Exit mobile version