सत्ता स्थापनेत उशीर का होतोय हे माहित नाही – संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पण, ही सदिच्छा भेट होती. त्यात कोणतंही राजकारण नव्हतं. सरकार स्थापनेसाठी शिवसेना अनुकूल आहे. तरीही सत्ता स्थापनेत उशीर का होतोय? याची कल्पना नाही. सत्ता स्थापनेत आमचा कोणताही अडथळा नाही. सर्वात मोठ्या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना भेटून करायला हवा असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: November 4, 2019 7:10 PM
Exit mobile version