महाआघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे ५७ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेविरोधात पुरोगामी लोकशाही आघाडीने रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करु, असे आश्वासन दिले आहे.