सध्या रुग्णांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची फार आवश्यकता असल्याचे बोले जात आहे. तर बऱ्याच रुग्णांचे नातेवाईक हे रेमडेसिवीरकरता वणवण फिरत आहेत. पण, हे रेमडेसिवीर केवळ रुग्णांना दोन ते दहा दिवसाच्या आत दिले तरच त्याचा फायदा होतो. पण, रेमडेसिवीर दिल्याने जीव वाचतो असे नाही, हे स्पष्ट मत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले आहे.