भुजबळांनी सांगितलं भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणामागील कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपलं महानगरला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान भुजबळ म्हणाले की, पाच वर्ष सत्तेत राहूनही भारतीय जनता पार्टीला सक्षम नेतृत्व तयार करता आले नाही. किंबहुना असे नेतृत्व जाणीवपूर्वक तयार होऊ दिले नाही. म्हणूनच आता ऐन लोकसभा निवडणुकीत सताधाऱ्यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. त्यातही यश न मिळाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोरं पळवण्याचे उद्योग आता भाजपने सुरु केले आहे.

First Published on: March 23, 2019 6:36 PM
Exit mobile version