मतदार म्हणून सरकारला प्रश्न कधी विचारणार?

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राची अधोगती होत आहे. आज राज्याला सत्तेपुढे घरंगळत न जाणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतला आमदार सरकारला बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारू शकत नाही. मात्र विरोधी पक्षातला आमदार सरकारला जेरीस आणू शकतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात बोलताना मांडली.

First Published on: October 10, 2019 9:38 PM
Exit mobile version