काँग्रेसचं नक्की चाललंय काय?

२२७ नगरसेवकांपैकी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ आहे फक्त ३३ नगरसेवकांचे तर राष्ट्रवादीचे आहेत ९ नगरसेवक. २००२ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ घटताना दिसत आहे. असे असूनही काँग्रेस स्वबळाचा नारा देते यावरून हे लक्षात येते की स्वबळाची बेडकी फुगवण्यासाठी हायकमांडकडूनच सांगण्यात आले असावे. अन्यथा नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही काँग्रेसच्या हाताचा करिष्मा मुंबईत नसताना स्वबळाचा नारा दिला नसता. यावरून काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरून चुकीचे निर्णय घेत आहे याची प्रचिती येत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नक्की चाललंय काय? हीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

First Published on: January 13, 2021 11:29 AM
Exit mobile version