मध्यमवर्गालाही मिळणार दिलासा

मध्यमवर्गालाही मिळणार दिलासा

मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी सरकार अध्यादेश काढून आयकरात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी करांच्या टप्प्यांतही बदल करण्याची तयारी सुरू आहे.प्रत्यक्ष कर संहितेसंदर्भातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनलकडून करांच्या दरांमध्ये कपात केली जाऊ शकते. सरकारच्या या पावलाचा नोकरदार वर्गाला फायदा पोहोचणार आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सूट दिल्यानंतर मोदी सरकार लवकरच व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. ज्याचं वेतन अर्थव्यवस्थेत आलेल्या मरगळीमुळे जास्त वाढलेलं नाही किंवा वाढलेलंच त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

First Published on: September 26, 2019 1:22 AM
Exit mobile version