धक्कादायक! सासुरवाडीत फोन हरवल्यामुळं पती नाराज; पत्नीला लटकवलं फासावर!

धक्कादायक! सासुरवाडीत फोन हरवल्यामुळं पती नाराज; पत्नीला लटकवलं फासावर!

सध्या मोबाईल ही काळाची गरज झाली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणं हे एकप्रकारचे व्यसन काही जणांना लागल्याचे दिसतंय. मोबाईल हरवल्याच्या कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर पतीने धक्कादायक पाऊल उचलंले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन हरवल्यामुळं नाराज झालेल्या या व्यक्तिनं आपल्या पत्नीची घरातच फासावर लटकावत हत्या केली आहे. ही घटना झारखंडमधील चतरामध्ये घडली असून या प्रकरणी आरोपी उमेश भुईया याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

असा घडला प्रकार

सासरवाडीमध्ये मोबाईल फोन हरवल्याच्या वादातून उमेश भुइया या पतीनं रागात टोकाचं पाऊल उचलून आपली पत्नी डॉली देवीला फासावर लटकावले. ही घटना चतरा सदर ठाणे क्षेत्रात हासबो या गावात घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृत डॉलीदेवीचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. घटनेनंतर आरोपी उमेशला अटक करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी आरोपी उमेश भुईया आपल्या सासरवाडीला गेला होता. तिथे त्याचा मोबाईल हरवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आल्यावर त्याचे आणि पत्नी डॉली यांच्यात मोठ्याने भांडण झाले. याच झालेल्या भांडणावरून पत्नीविरूद्ध मनात राग ठेऊन आरोपी उमेशनं पत्नी डॉलीला आपल्याच राहत्या घरी फासावर लटकवलं.


बंगालमध्ये लोकल सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाची परवानगी; मुंबईकर प्रतिक्षेत

First Published on: November 6, 2020 3:26 PM
Exit mobile version