आमचा फोटो वृत्तपत्रात छापू नका… ३ भावंडांनी चिठ्ठी लिहत केली आत्महत्या

आमचा फोटो वृत्तपत्रात छापू नका… ३ भावंडांनी चिठ्ठी लिहत केली आत्महत्या

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यातून दोन भावांनी आणि बहिणीने घराच्या अंगणात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यांच्याकडील सुसाइड नोटही पोलिसांनी जप्त केली आहे. आईच्या मृत्यूचं दु:ख आम्हाला विसरता येत नाही आहे. यामुळे तिन्ही भावंडं स्वत:च्या इच्छेनुसार आत्महत्या करीत आहोत, असं त्यांनी सुसाइड नोटमधअये लिहून ठेवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

लखीमपूर पोलीस स्टेशन सदर कोतवाली परिसरातील शांती नगर परिसरातील ही घटना आहे. मुलांचे वडील आदित्य हे युपी अ‍ॅग्रो विभाग लखनऊ येथे नोकरी करतात. गुरुवारी सकाळी ते लखनऊला गेले असता संध्याकाळी ते घरी परत आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बंद असल्याचं आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसमोर घराचा दरवाजा तोडला असता, त्यांना घराच्या अंगणात त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा नागेश्वर, २८ वर्षीय मुलगा विवेक आणि २५ वर्षांची मुलीने गळफास घएऊन आत्महत्या केल्याचा दिसलं. आत्महत्या केलेल्या तीन मुलांचे वडील आदित्य यांनी सांगितलं की सप्टेंबरमध्ये त्यांची पत्नी मरण पावली, त्यानंतर ही तिन्ही मुलं नेहमीच दु:खी असत.

वडिलांनी आपल्या मोठ्या मुलाचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आईच्या निधनानंतर मुलानेही लग्न करण्यास नकार दिला. प्रत्येकजण अस्वस्थ राहत होते. आत्महत्या केलेल्या मुलांच्या वडिलांनी सांगितलं की, ही तिन्ही मुले दररोज आईची आठवण करून तासनतास रडत असत. आईच्या आठवणीत मुलांनी खाणं-पिणं सोडून दिलं होतं.


हेही वाचा – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे कोविड रुग्णालयाला अचानक भेट


 

First Published on: July 11, 2020 10:32 PM
Exit mobile version