छत्तीसगडमध्ये ऐतिहासिक लढाई जिंकल्यानंतर काँग्रेसने जनतेचे आभार मानले आहेत. छत्तीसगडचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भूपेश बघेल आणि राज्य प्रभारी पीएल पुनिया यांनी निवडणुक जिंकल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. आम्ही षडयंत्रकारी सरकारला पराभूत केले असल्याची टीका भूपेश बघेल यांनी केली आहे. या निवडणुकीतील यशाला ऐतिहासिक असल्याचे सांगत काँग्रेसने आता सेमीफायनल जिंकले आहे. २०१९ ची फायनल जिंकायची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Bhupesh Baghel, Chhattisgarh Congress President: This is a victory of democracy. BJP had a lot of money & a team of corrupt officers, they also had conspirators in their pocket. Despite all of this, the mandate given by the people in Chhattisgarh is historic. pic.twitter.com/azcBZqvgKM
— ANI (@ANI) December 11, 2018
षडयंत्रकारांच्या सरकारला सडेतोड उत्तर
भूपेश बघेल यांनी सांगितले की, छत्तीसगडची जनता ऐतिहासिक निर्णय दिला आहे. छत्तीसगडमध्ये विजय झाल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव केला. छत्तीसगडच्या रमन सरकारला पराभूत करत विजय मिळवला. आता आम्ही सेमीफायनल जिंकलो आहोत. २०१९ मध्ये फायनल आहे त्यामध्येही आम्हीचं जिंकणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आम्ही षडयंत्रकारांच्या सरकारला सडेतोड उत्तर दिले आहे.
दिलेले आश्वासन पूर्ण करु
राज्य प्रभारी पीएल पुनिया यांनी सांगितले की, आम्ही जनतेला आश्वासन दिले आहेत आणि ते पूर्ण करणार आहोत. जो अजेंडा आमच्या समोर आहे. आम्ही त्याच्यासाठी निर्धारित केलेली अंतिम मुदत पूर्ण करू असे आश्वासन पुनिया यांनी छत्तीसगडच्या जनतेला दिले आहे. जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराची लवकरच बैठक होणार आहे. ज्यामध्ये विधानसभेचे नेते निवडुन येतील.