काँग्रेसचा देशद्रोहींना पाठिंबा, तर जाहीरनामा बनावट- पंतप्रधान मोदी

काँग्रेसचा देशद्रोहींना पाठिंबा, तर जाहीरनामा बनावट- पंतप्रधान मोदी

काँग्रेसचा देशद्रोहींना पाठिंबा, तर जाहिरनामा बनावट - पंतप्रधान

काँग्रेस पक्षाने मंगळवार दि.२ एप्रिल रोजी आपला जाहीरनामा जाहिर केला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेच्या जाहिरनामाला बनावट असल्याची टीक केली आहे. आज दि. ३ रोजी सकाळी १० वाजता अरुणाचल प्रदेश येथील पासीघाटीमध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसपक्षवर निशाणा साधला होता. या सभेत त्यांनी काँग्रेस पक्ष देशद्रोहाबाबत कायदा रद्द करण्याच्या मागे आहे. तसेच देशद्रोहींना पाठिंबा देत आहेत अशीही टीका पंतप्रधान यांनी केली आहे.

PM Narendra Modi in Pasighat: Inn logon (Congress party) ki tarah hi inka ghoshna patra bhi brashth hota hai, beimaan hota hai, dakosalo se bhara hota hai aur isilye use ghoshna patra nahi dakosala patra kehna chaiye. #ArunachalPradesh pic.twitter.com/IyUcw0Wa3I

— ANI (@ANI) April 3, 2019

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात

काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात एकूण ५ सर्वीत महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आली होती. यामध्ये न्यायासह, रोजगार, आरोग्य, शिक्षण, गरिबी आणि शेतकऱ्यांचा समावेश होता. तसेच त्यांनी देशद्रोह कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले. तसेच गरिबांना किमान उत्पन्न देण्याची हमी सुद्धा जाहिरनामात देण्यात आली. तसेच प्रत्येक गरिबाला वर्षाला ७२ हजार रूपये मिळतील, अशी घोषणा जाहिरनाम्यातून केली.

काँग्रेसवर टीकांचा भडिमार

मात्र, पंतप्रधान मोदी यांनी आजच्या सभेमध्ये काँग्रेसवर आणि त्यांच्या जाहिरनाम्यावर टीकांचा भडिमार केला आहे. भाजप सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असतो. २०१४ पर्यंत १८ हजार घरांमध्ये वीज सुद्धा नव्हती. त्यामुळे काँग्रेसचा जाहिरनामा बनावट आणि भ्रष्ट आहे, अश्या प्रकारच्या टिकांचा घाणाघाती हल्लाचा केला आहे.

First Published on: April 3, 2019 1:44 PM
Exit mobile version