कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या नोकर्यांवर देखील कोरोना व्हायरसचे सावट दिसतंय. काही कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांची कपात करणं देखील सुरू केले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारची एक योजना असून ज्या अंतर्गत एखादा कर्मचारी बेरोजगार झाल्यास अशावेळी त्या कर्मचार्याला २४ महिन्यांसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
CoronaCrisis: यंदा नोकरभरती नाही; राज्य सरकारचा निर्णय
अशी आहे योजना
मोदी सरकारच्या या योजनेचे नाव आहे “अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना”. या योजनेंतर्गत नोकरी न मिळाल्यास सरकार दोन वर्षे आर्थिक सहाय्य करत राहील. ही आर्थिक मदत दरमहा दिली जाईल. बेरोजगार व्यक्तीला हा लाभ गेल्या ९० दिवसांच्या त्याच्या सरासरी उत्पन्नाच्या २५ टक्के इतकाच दिला जाईल. या योजनेचा फायदा ईएसआयसी बरोबर विमा उतरवलेल्या आणि दोन वर्षाहून अधिक काळ नोकरी केलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचार्यांना मिळू शकेल. याशिवाय आधार आणि बँक खाते डेटा बेसशी जोडणे महत्वाचे आहे.
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम ईएसआयसी वेबसाईटवर जाऊन अटल बीमित व्यक्ति कल्याण योजने अंतर्गत नोंदणी करावी लागेल. या योजनेबद्दल अधिक माहिती https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकवर मिळेल.
या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
ज्या कर्मचाऱ्यांना चुकीच्या वर्तवणुकीमुळे कंपनीतून काढून टाकले गेले असेल, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल असेल किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली असेल त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही.