प्रवाशांसाठी रेल्वेचे ‘डिजिटल लॉक सिस्टम’; सामान राहणार सुरक्षित

प्रवाशांसाठी रेल्वेचे ‘डिजिटल लॉक सिस्टम’; सामान राहणार सुरक्षित

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना आपल्या सामानाची काळजी असते. कारण बऱ्याच प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा या चोरीच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी भारतीय रेल्वेने OTP आधारित ‘डिजिटल लॉक सिस्टम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांधून प्रवास करताना प्रवाशांचे सामान सुरक्षित राहणार आहे. (Digital Lock System Luggage In Train Not Be Stolen And Train Door Not Open Without Otp)

मालवाहतूक आणि पार्सल गाड्यांमधील मालाची वाहतूक करताना मालाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय रेल्वे ‘वन टाइम पासवर्ड’ (OTP) तंत्रज्ञानावर आधारित नवीन ‘डिजिटल लॉक’ सिस्टम सुरू करणार आहे. ही प्रणाली वस्तू आणि पार्सलसाठी वाढीव सुरक्षा प्रदान करणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीदरम्यान चोरीच्या घटना कमी होणार आहे.

अशी असेल सिस्टम

योग्य दरात ही सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या शोधात भारतीय रेल्वे

सद्यस्थितीत योग्य दरात ही सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या शोधात भारतीय रेल्वे आहे. ओटीपीवर आधारित नवीन ‘डिजिटल लॉक’ प्रणाली, जी मालगाड्या आणि पॅकेज ट्रेनमध्ये स्थापित केली जाईल. वाहतुकीदरम्यान मालाची सुरक्षा वाढवेल. या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे एक सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक उद्योगातील चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा – ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढणार, मशाल चिन्हावरून समता पक्षाची SC मध्ये धाव

First Published on: February 23, 2023 5:04 PM
Exit mobile version