मृत समजल्या जाणाऱ्या महिलेने हालचाल केली आणि

मृत समजल्या जाणाऱ्या महिलेने हालचाल केली आणि

मृत समजल्या जाणाऱ्या महिलेने हालचाल केली आणि

गंगा नदीवरुन पुलापासून वाहून येणारी महिला मृत असल्याचे सर्वप्रथम जाणवले. मात्र, अचानक महिलेने हालचाल करताच मच्छिमारांना देखील धक्काच बसला. ही महिला चक्क १० किलोमीटर अंतर वाहून आली होती. कडाक्याच्या थंडीत वाहून येणारी महिला सुरुवातीला मृत समजली जात होती. मात्र, नंतर पाहताच सर्वांनाच धक्का बसला. ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडली आहे. अनिता देवी असे या महिलेचे नाव आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या वृत्तानुसार, राघोपूर दियारा येथील रहिवासी अनिता देवी सायंकाळच्या सुमारास गंगा नदीवरील पुरावरुन रिक्षाने जात होती. तिला अचानक चक्कर आली म्हणून ती रिक्षातून उतरुन पुलावर बसली. मात्र, त्याच दरम्यान अनिता देवी या महिलेचा तोल गेला आणि त्या गंगा नदीत पडल्या. लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केला. पण, गंगेच्या प्रवाहात त्या पुढे वाहून गेल्या. तब्बल १२ तास पाण्यात होत्या. १० किलोमीटरचे अंतर पार करत आल्या. त्यांना मच्छिमारांनी पाहिले. सर्वप्रथम त्यांना मृतदेह असल्याचे जाणवले. मात्र, अचानक त्यांची हालचाल झाल्याचे पाहून त्यांनी अनिता देवी यांना जिवंत बाहेर काढले. यामधील एका मच्छिमाराने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. रात्रभर पाण्यात राहिल्याने तिची तब्येत बिघडली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – ब्रिटनहून आलेल्या ६०० पैकी एकालाही कोरोनाचे लक्षण नाही – आयुक्त


 

First Published on: December 22, 2020 9:53 PM
Exit mobile version