Farmers Protest : सिंघू सीमेवर दगडफेक, जमावानं शेतकर्‍यांचे तंबू उखडले

Farmers Protest : सिंघू सीमेवर दगडफेक, जमावानं शेतकर्‍यांचे तंबू उखडले

सिंघू सीमेवर दगडफेक, जमावानं शेतकर्‍यांचे तंबू उखडले

दिल्ली आणि हरयाणाच्या सिंघू सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंघू सीमा ही शेतकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आहे. जमावाने दगडफेक करत शेतकऱ्यांचे तंबू उखडून टाकले आहेत. हा जमाव स्थानिक लोकांचा असल्याचं समजतंय. दगडफेक केल्यानंतर शेतकरी आंदोलक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाला. स्थानिक आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. या घटनेत एक पोलीस जखमी झाला आहे.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनामध्ये मोठी फूट; दोन शेतकरी गटांची आंदोलनातून माघार


 

First Published on: January 29, 2021 3:05 PM
Exit mobile version