स्थलांतरित कामगारांसाठी सरकारची नवीन योजना

स्थलांतरित कामगारांसाठी सरकारची नवीन योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारमण

कोरोना संकटाच्या वेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार मुळ गावी परतले. यामुळे कामगारांसमोर रोजगाराचं संकट निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार विशेष मोहीम सुरू करणार आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून रोजी या योजनेला प्रारंभ करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी माध्यमांना या योजनेची माहिती दिली.

या योजनेंतर्गत देशातील विविध भागांमधून आपापल्या गावी स्थलांतर करणार्‍या परप्रांतीय कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासह देशातील सहा राज्यांतील ११६ जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू केली जाईल. २० जूनपासून मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने या राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंध मंत्रालयातील मंत्रीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जाणार आहेत.


हेही वाचा – उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा – पंतप्रधान मोदी


 

First Published on: June 18, 2020 4:50 PM
Exit mobile version