कोरोना संकटाच्या वेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार मुळ गावी परतले. यामुळे कामगारांसमोर रोजगाराचं संकट निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार विशेष मोहीम सुरू करणार आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून रोजी या योजनेला प्रारंभ करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी माध्यमांना या योजनेची माहिती दिली.
या योजनेंतर्गत देशातील विविध भागांमधून आपापल्या गावी स्थलांतर करणार्या परप्रांतीय कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासह देशातील सहा राज्यांतील ११६ जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू केली जाईल. २० जूनपासून मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने या राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंध मंत्रालयातील मंत्रीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जाणार आहेत.
#GaribKalyanRozgarYojana with an outlay of Rs 50,000 Crores will cover 116 districts in 6 States. The Yojana will be launched by PM @narendramodi on 20th June, 2020 pic.twitter.com/DROHI6ySSC
— PIB India (@PIB_India) June 18, 2020
हेही वाचा – उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा – पंतप्रधान मोदी