दिल्ली नाही बंगाल आहे, ‘गोली मारो…’च्या घोषणा चालणार नाहीत

दिल्ली नाही बंगाल आहे, ‘गोली मारो…’च्या घोषणा चालणार नाहीत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील शहिद मिनार मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी ‘गोली मारो…’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फटकारले आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी नगरपालिका आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आज सोमवारी ‘बेंगलर गोरबो ममता’ (बंगालचा अभिमान ममता) हा एक व्यापक प्रचार कार्यक्रम सुरू केला.


हेही वाचा – होळीच्या तोंडावर भारतासाठी ‘व्हायरल’ कोरोनाचा एलर्ट

दरम्यान, या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी ‘गोली मारो…’ अशा घोषणा कोलकातामध्ये चालणार नाहीत. ही दिल्ली नाही, आणि मी ‘गोली मारो…’ अशा घोषणा सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिल्ली हिंसाचारावर मत व्यक्त केले. “दिल्लीतील हिंसाचार हा नरसंहार होता. निष्पाप लोकांच्या हत्येने मला तीव्र वेदना होत आहे,” अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘बंगालचा अभिमान ममता’ या मोहिमेचा एक भाग म्हणून तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) चे एक लाख कार्यकर्ते राज्यभरात प्रचार करतील आणि पश्चिम बंगालच्या विकास आणि विकासासाठी आणि जातीय सलोखा टिकवण्यासाठी बॅनर्जी कसे महत्त्वाचे आहेत हे लोकांना समजावून सांगतील. कार्यक्रमाचा पहिला टप्पा ७५ दिवसांचा असणार आहे.

 

First Published on: March 2, 2020 5:38 PM
Exit mobile version