देशात शनिवारी दिवसभरात १० लाख ७८ हजार ५४४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत १० ऑक्टोबरपर्यंत ८ कोटी ६८ लाख ७७ हजार २४२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
10,78,544 samples tested for #COVID19 yesterday. Total 8,68,77,242 samples tested in the country up to 10th October: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/SJz35NL8Yy
— ANI (@ANI) October 11, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत.
ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे आधारस्तंभ असलेले धडाडीचे कार्यकर्ते, निस्पृह वृत्ती, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव, नेहमी हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून वागणारे राजेंद्र वैती यांचं रात्री दुःखद निधन झालं आहे. ही सगळ्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वेळेस काम पाहिले. राज्य ग्रंथालय संघावर देखील त्यांनी काम पाहिले असून राज्यभरातील ग्रंथालय कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता. “ग्रंथमित्र” हा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्याध्यक्ष, कार्यवाह, कार्यकारणी सभासद अशा विविध पदांवर काम पाहिलेले आहे तसेच अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. शिवसेनेचे माननीय आनंद दिघे साहेब यांच्याशी त्यांचा असलेला स्नेह खूप घनिष्ठ आणि निष्ठावान असा होता.
देशात गेल्या २४ तासांत ७४ हजार ३८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९१८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७० लाख ५३ हजार ८०७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८ हजार ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६० लाख ७७ हजार ९७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ८ लाख ६७ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India's #COVID19 tally crosses 70-lakh mark with a spike of 74,383 new cases & 918 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 11, 2020
Total case tally stands at 70,53,807 including 8,67,496 active cases, 60,77,977 cured/discharged/migrated cases & 1,08,334 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/Ynu0wOodzU
जगात कोरोना विषाणूचा कहर कायम असून कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ३ कोटी ७४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून यापैकी १० लाख ७७ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ८१ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शनिवारी राज्यात ११,४१६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,१७,४३४ झाली आहे. राज्यात २,२१,१५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा