अत्याधुनिकतेच्या नावाखाली संरक्षण खात्यात सैन्य कपातीची कुर्‍हाड

अत्याधुनिकतेच्या नावाखाली संरक्षण खात्यात सैन्य कपातीची कुर्‍हाड

भारतीय सैन्य स्वत: ला अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याच्या नावाखाली आता सैन्य कपातीची कुर्‍हाड संरक्षण विभागाकडून अवलंबली जाण्याची तयारी सुरू आहे. पुढील काही वर्षात तिन्ही दलातील एक लाख सैनिकांची कपात केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. सैन्य कपातीतून बचत होणार्‍या पैशातून सैन्याला नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा मानस आहे. शत्रू देश असलेल्या चीन आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत भारतीय सैन्यात असलेल्या 14 लाख सैनिकांची संख्या कमी असूनही केंद्राने कपातीचे धोरण अवलंबल्याने माजी सैन्य अधिकार्‍यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय सैन्य दलाला चांगली शस्त्रे आणि नवी उपकरणे मिळावीत, म्हणून पैशांची अडचण आहे. संरक्षणविषयक संसदीय समितीने गेल्या महिन्यातच आपला अहवाल सभागृहात सादर केला. या अहवालात, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी सैन्याला तंत्रज्ञानाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे आणि युद्धाच्या नव्या मार्गासाठी स्वत:ला तयार करायचे आहे, असे म्हटले. पूर्वी सैन्य दुर्गम भागात तैनात केले जायचे, मग त्यासाठी स्वत:ची सर्व व्यवस्था करावी लागत असे. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे आता त्याची गरज भासत नाही.

पूर्वीप्रमाणे सैन्यात बेस दुरुस्ती डेपो होते, ज्यात वाहने दुरुस्ती केली जात होती. पण आता ते आऊटसोर्स केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, टाटा कंपनीकडे कार असल्यास ती टाटाच्या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठविली जाऊ शकते. याद्वारे जी बचत होईल, सैन्य युद्धाच्या नव्या पद्धतींसाठी आवश्यक असणारी जागा, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या नवीन तंत्रज्ञानावर खर्च करता येईल, असा दावा त्यांनी केला.

येत्या काही वर्षांत सैनिक संख्या एक लाखांनी कमी केल्यास त्यातून वाचणार्‍या पैशातून नवीन तंत्रज्ञान उभे करता येईल, असे रावत म्हणाले. आपले लक्ष बाहेरील भागात पदस्थापित सैन्य दलाच्या सैनिकांवर असेल. आपल्या सैनिकांना आधुनिक रायफल द्यायची आहे. नवी उपकरणे आणि तंत्रज्ञान द्यायचे आहे, यासाठी सैन्य कपात ही काळाची गरज असल्याचा दावा जनरल रावत यांनीच केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

First Published on: April 7, 2021 5:20 AM
Exit mobile version