अजब! नवऱ्याच्या डोक्यात मारला पत्नीने तवा; जेवण झाल्यावर गेला जीव

अजब! नवऱ्याच्या डोक्यात मारला पत्नीने तवा; जेवण झाल्यावर गेला जीव

हत्या

पती-पत्नीची भांडण ही बातमी येणं काही नवीन नाही. मात्र पत्नीने केलेला वार आणि पतीचा बऱ्याच वेळानंतर गेलेला जीव, हे ऐकणं थोड विचित्र वाटतं. मात्र अशी एक घटना मटौर गावातील परिसरात घडली आहे. एका दाम्पत्यामध्ये कोणत्यातरी विषयावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये कडाक्याच भांडण झालं. नवऱ्याने पत्नीला बेल्टने मारहाण केली. तर पत्नीनेही रागाच्या भरात नवऱ्याच्या डोक्यात तवा मारला. पुढे दोघेही वातावरण निवळल्यानंतर एकत्र बसून जेवले. मात्र सायंकाळी पती झोपला तो कधी उठलाच नाही. त्या हल्ल्यामुळे पतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण 

मिळालेल्या माहितीनुसार, मटौर गावातील एका परिसरात फुलचंद (वय ३२) यांचे दुपारी त्यांच्या पत्नी सपनासोबत कडाक्याचे भांडण झाले. विषय इतका विकोपाला गेला की पत्नीने संतापून पतीच्या डोक्यात तवा मारला. मात्र थोड्या वेळाचे पतीचा या हल्ल्यामुळे मृत्यू झाला. पत्नी तिच्या बाळाला दुध पाजण्यासाठी उठली तेव्हा ही बाब तिच्या निदर्शनास आली. त्यानंतर तिने आपल्या दिराला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे आले आणि फुलचंदला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरने त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात जगभरातून पती-पत्नीमधील भांडणाची प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंसाचाराच्या घटना घडल्यास महिलांनी त्वरीत १०० नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन फेसबुकच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा हा विपरीत परिणाम कौटुंबिक हिंसाचारात होत असल्याचे यातून पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

राज्यपाल नियुक्त आमदारकी; मध्यस्थीसाठी मुख्यमंत्र्यांनी मोदींना फोन केल्याची चर्चा

First Published on: April 29, 2020 10:20 PM
Exit mobile version