नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार आणि प्रेक्षकांची लाडकी जोडी अंजली बाई आणि राणा दा आता खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी होणार असल्याची बातमी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या दोघांचे अचानक साखरपुडा झालेले फोटो पाहून सोशल मीडियावर अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आता मात्र त्या दोघांच्या चाहत्यांना या दोघांचे लग्न कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिकने याबाबत उत्तर दिले आहे.
पुण्यात पार पडणार अक्षया आणि हार्दिकचे लग्न
कोल्हापूरवरून मागवणार लग्नाचे कपडे
त्यावेळी अक्षया आणि हार्दिक असं सुद्धा म्हणाले होते की, “आमच्या प्रेमाची सुरूवात तुझ्यात जीव रंगला या मालिकूतन झाली, ती मालिका कोल्हापूरमधील होती, त्यामुळे आम्ही आमच्या लग्नाचे कपडे तिकडूनच मागवणार आहोत”.