कंगना रनौत ‘भारत बंद’वर म्हणते, ‘आणा कुऱ्हाड, विषय संपवून टाकू’

कंगना रनौत ‘भारत बंद’वर म्हणते, ‘आणा कुऱ्हाड, विषय संपवून टाकू’

कंगना रनौत 'भारत बंद'वर म्हणते, 'आणा कुऱ्हाड, विषय संपवून टाकू'

कृषी कायदे विरोधातील शेतकरी आंदोलनाला नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतचा विरोध आहे. तिने शेतकरी आंदोलना संदर्भात अनेक ट्विट केले आहेत. यावरून कंगना आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये चांगलचे ट्विट वॉर रंगले होते. पंजाबी आणि बॉलिवूड गाय दिलजीत दोसांज आणि कंगनात ट्विटवरील शाब्दिक युद्ध चर्चेत आले होते. दरम्यान आता शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. यासंदर्भात देखील कंगनाने आज ट्विट केले आहे.

कंगना रनौतने जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ रिट्विट करून शायरीच्या अंदाजत लिहिले आहे की, ‘चला भारताला बंद करू या, तशी वादळांची काहीच कमी नाही. पण आणा कुऱ्हाड काही भाग करू या, प्रत्येक आशा येथे दररोज मरत आहे, देशभक्तांना सांगा आता तुमच्यासाठी देशाचा एखादा तुकडा मागा, या तुम्ही रस्त्यावर आणि तुम्ही देखील आंदोलन करा, चला आता हा विषय संपवून टाकू.’

कंगनाने अशा प्रकारचे ट्विट करून अनेकांवर निशाणावर साधला आहे. यापूर्वी कंगनाला शेतकरी आंदोलना संदर्भात सोशल मीडियावरील युजर्सने टार्गेट केले होते. यादरम्यान तिचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती की, ‘सोशल मीडियावर रिकामे लोक आणि ज्यांना काहीच काम नसतात ती असतात. कारण ज्या लोकांना काम असते त्या लोकांना सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी वेळ नसतो.’


हेही वाचा – #आज_भारत_बंद_है Vs #BharatBandhNahiHoga ट्विटरवर सुरू आहे कोल्ड वॉर


 

First Published on: December 8, 2020 11:49 AM
Exit mobile version