घाडगे & सून मालिकेला रंजक वळण

घाडगे & सून मालिकेला रंजक वळण

मालिकेना गाठला ५०० भागांचा पल्ला

कलर्स मराठीवरील “घाडगे & सून” ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेने बघता बघता तब्बल ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. ५०० भागांनंतर मालिका आणखी रंजक वळण घेणार आहे. याचबरोबर आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच अचंबित करणाऱ्या घटनाही बघायला मिळणार आहेत.

गेला आठवडा असा रंगला

घाडगे सदनमध्ये अक्कांच्या येण्याने माईंना बराच धीर मिळाला दुसरीकडे अमृता प्रेक्षकांना पुन्हाएकदा साडी आणि मंगळसूत्रामध्ये दिसली. अक्कांनी परत जाताना अक्षयला एक मोठं सत्य सांगितले ज्यामुळे आता लवकरच अक्षय आणि कियाराच आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. कियारा गरोदर नसल्याचं सत्य अक्षयला कळल्यामुळे तो पूर्णतः खचून गेला आहे. आता पुढे अक्षय कुठले पाउल उचलेल ? कियाराला अक्षय या गोष्टीचा जाब विचारू शकेल का ? अक्षय कियाराचे सत्य घरच्यांना सांगू शकेल ? कियारा घरात परतली आहे आता अमृताचं अस्तित्व घाडगे परिवारात काय असेल ?  हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळवायची असतील तर तुम्हाला “घाडगे & सून”चे पुढील भाग अजिबात चुकवून चालणार नाहीत.

मालिकेच्या सेटवर जंगी सेलेब्रेशन

 “घाडगे & सून मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले यावर खरोखरच विश्वास बसत नाहीये… असं वाटत आहे काल परवाच शूट सुरु झालं. अक्षय ही भूमिका करताना मला खूप समाधान मिळत आहे. कारण मी आजवर ज्या भूमिका साकारल्या त्या सगळ्यांपेक्षा वेगवेगळ्या छटा या भूमिकेला आहेत, आणि खूप आव्हानात्मक आहे. मी जेंव्हा काही कार्यक्रमांना जातो तेंव्हा मला प्रेक्षक अकी म्हणून हाक मारतात इतकी ही भूमिका त्यांना आपलीशी वाटते आणि आवडते याचा मला आनंद आहे. मला या मालिकेच्या रुपाने एक दुसरं कुटुंबच मिळालं आहे.- चिन्मय उदगीरकर

 

First Published on: February 25, 2019 1:39 PM
Exit mobile version