Good News : …अखेर 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर; सुनील पाल यांनी व्यक्त केला आनंद

Good News : …अखेर 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर; सुनील पाल यांनी व्यक्त केला आनंद

राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना अवघ्या 15 दिवसांनंतर शुद्ध आलेली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर मागील 15 दिवसांपासून दिल्ली येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याकाळात त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे देखील सांगितले जात होते. त्यांच्या कुटुंबियांसह, त्यांचे चाहते देखील त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. दरम्यान, आता राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्याची बातमी समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव यांना आली शुद्ध
राजू श्रीवास्तव यांचा सल्लागार अजीत सक्सेना याने राजूच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितली की, राजू श्रीवास्तव यांना सकाळी 8 वाजता शुद्धा आली. राजू यांना शुद्ध आल्याने त्यांचे कुटुंबिय खूश झाले आहेत. तसेच राजूने अनेक चाहते देखील ही बातमी ऐकूण खूप आनंदी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना सकाळी 8 च्या आसपास शुद्ध आली. त्यानंतर 9 वाजता डॉक्टरांच्या टीम ने राजूंची तपासणी केली.

सुनील पालने व्यक्त केला आनंद

राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.


हेही वाचा :राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलीने दिली माहिती

First Published on: August 25, 2022 1:26 PM
Exit mobile version