नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय असणारी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दूरदर्शनवर रामायण मालिका पुन्हा प्रसारित केली जात आहे. यामुळे रामायणातील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘रामायण’ या मालिकेतील ‘सुग्रीव’ची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम सुंदर कालानी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र, ६ एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेता श्याम सुंदर कालानी यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात रामायण या मालिकेपासून झाली होती. त्यांच्या निधनानंतर रामायणात श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनीही ट्विटरवरून कलानी यांच्या आठवणीत श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त केला आहे.
दूरदर्शन के प्रसिद्ध धारावाहिक #रामायण में सुग्रीव का किरदार निभाने वाले श्री श्याम सुंदर कालानी जी कालका हाउसिंग बोर्ड कॉलोनी के निवासी थे। लाॅक डाउन के दौरान गत रविवार को उनका निधन हो गया था। वे लंबे समय से कैंसर से लड़ रहे थे। ॐ शांति ?#Ramayana pic.twitter.com/dNZqiLIAaA
— Arun Govil (@ArunGovilSpeaks) April 9, 2020
अरुण गोविल यांनीही ट्विटरवरून शोक व्यक्त करताना असे म्हटले की, ‘रामायणातील ‘सुग्रीव’ साकारणाऱ्या श्याम सुंदर कलानी यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मी दुखीः आहे. श्याम सुंदर हे एक सज्जन व्यक्ती होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ‘