नाना पाटेकरमुळे सोडलं बॉलीवूड; तनुश्री दत्ताचा आरोप

नाना पाटेकरमुळे सोडलं बॉलीवूड; तनुश्री दत्ताचा आरोप

तनुश्री दत्ता

मॉडेल, अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आपोर केला आहे. या अभिनेत्यामुळे आपण बॉलीवूडला रामराम ठोकला होता, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तब्बल ८ वर्षांनंतर तनुश्री सिनेजगतात पुनरागन करत असून कोणत्या चित्रपटातून नाही तर छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १२’ मधून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या कार्यक्रमाच्या लाँचिंगवेळी सलमाना खान याने काही सदस्यांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये तनुश्री दत्ता आणि तिची बहिण इशिता दत्ताच्या नावाचीही घोषणा केली होती.

नाना विरोधात केलेली तक्रार दाखल 

२००८ साली तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. यासंबंधी तिने पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. त्यानंतर पासूनच तनुश्रीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली, असे म्हटले जाते. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका आयटम साँगसाठी तनुश्रीची निवड करण्यात आली होती. त्यावेळी तिने असे म्हटले होते की, नाना पाटेकर यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच नानासोबत इंटिमेट सीन करण्यास आपण नकार दिला होता. त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. तनुश्री दत्ताने २०१० साली आलेल्या अपार्टमेंट चित्रपटात अखेरचा अभिनय केला होता.

तनुश्री – इशिता येणार ‘बिग बॉस’मध्ये 

मिस इंडिया युनव्हर्स असलेली तनुश्री दत्ता या शोमध्ये बहिणीसोबत सहभागी होणार आहे. ‘आशिक बनाया आपने’, ‘ढोल’, ‘चॉकलेट’ सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांनी तनुश्रीला पाहिले आहे. यापूर्वी इशिताला प्रेक्षकांनी ‘दृश्यम’ या चित्रपटात पाहिले आहे. त्याशिवाय तिने ‘एक घर बनाऊंगा’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतही काम केले होते.

First Published on: September 10, 2018 10:08 AM
Exit mobile version