टायगर-दिशाचे ‘या’ कारणाने झाले ब्रेकअप

टायगर-दिशाचे ‘या’ कारणाने झाले ब्रेकअप

बॉलिवूड स्टार कलाकार दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ या दोघांच्याही नावाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या दोघांनी आपली रिलेशनशिप कधी मान्य केले नाही, परंतु अनेकदा लंच डिनरला दोघेही एकत्र जाताना दिसले.अभिनेत्री दिशा आणि अभिनेता टायगर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच टायगर एका रेस्टॉरंटच्या बाहेर गर्दीपासून दिशाला प्रोटेक्ट करताना दिसला होता आणि त्यांचे हे फोटो खूप व्हायरलही झाले होते. हे दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीच उघड बोलले नव्हते तर आता ब्रेकअपबद्दल काय बोलणार याकडे सगळ्याच चाहत्यांचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांमध्ये दोघेही आपल्या रिलेशनशिपमध्ये आंनदी दिसत होते. मात्र पिंकविलाच्या अहवालानुसार, या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय एकत्र मिळून घेतला आहे.

या दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांची जवळीक वाढल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. तेव्हापासूनच टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. पण आता यामागे आदित्य नव्हे तर दिशा आणि टायगरमधील वाद असल्याचे समजते आहे.

मात्र टायगर आणि दिशा यांचा ब्रेकअप होण्याचे यामागे आदित्य हे कारण नव्हे, असे सांगितले जात आहे. याशिवाय, दोघांमध्ये मतभेद हे पुर्वीपासूनच होते मात्र आता दोघांनी असा निर्णय घेतला की, ते लव्हर्सपेक्षा अधिक चांगले मित्र राहू शकतात. त्यांनी आता ऑफिशिअली ब्रेकअप केलं असून हे नातं संपवण्याचा निर्णय या दोघांनीही परस्पर संमतीनं घेतला आहे.

First Published on: June 25, 2019 11:10 AM
Exit mobile version