जेव्हा कोणताच चित्रपट चालत नाही…ब्रह्मास्त्रच्या बहिष्कारावर रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया

जेव्हा कोणताच चित्रपट चालत नाही…ब्रह्मास्त्रच्या बहिष्कारावर रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित ब्रह्मास्त्र चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असले तरी काहीजण सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. त्यामुळे चित्रपट नक्की काय कमाल करेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आता रणबीर कपूरने या बहिष्काराबाबत आपलं मत मांडलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, “मी माझ्या स्वतःचे उदाहरण देतो. काही आठवड्यांपूर्वी माझा शमशेरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेचा अनुभव घेतला नव्हता. परंतु तरी सुद्धा त्या चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर काहीच कमाल केली नाही. कारण प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही. शेवटी फक्त कटेंट काय आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही चांगला चित्रपट दिला…चांगला कटेंट दिला तर लोकांना ते आवडते.”

पुढे रणबीर म्हणाला की, चित्रपट पाहणे, काही वेगळा अनुभव घेणे, स्वतःचे मनोरंजन करणे कोणाला आवडत नाही? चित्रपटातील भावनिकतेने कोणाला हसायला किंवा रडायला आवडत नाही. जर कोणता चित्रपट चालत नसेल म्हणजेच त्या चित्रपटाचं कटेंट चांगले नाही आणि हेच चित्रपटाच्या अपयशाचे उत्तर आहे.

का खास आहे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट?
ब्रह्मास्त्र चित्रपटाला 2022 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण या चित्रपटात दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्या दोघांचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.


हेही वाचा :

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री होणार कतरिनाची वहिनी; ‘कॉफी विथ करण’मध्ये झाला खुलासा

First Published on: September 8, 2022 1:11 PM
Exit mobile version