Amravati Violence: शरद पवारांच्या आशीर्वादाने होतायत दंगली – अनिल बोंडे

Amravati Violence: शरद पवारांच्या आशीर्वादाने होतायत दंगली – अनिल बोंडे

Amravati Violence: शरद पवारांच्या आशीर्वादाने होतायत दंगली - अनिल बोंडे

त्रिपुरा घटनेविरोधात अमरावतीमध्ये भाजपने आज, शनिवारी बंदची हाक दिली होती. मात्र सलग दुसऱ्यादिवशी अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुस्लिम बांधवांकडून तोडफोड, दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान माजी कृषीमंत्री, माजी आमदार आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी ट्वीट केलं आहे. ‘अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात,’ अशी टीका अनिल बोंडेंनी पवारांवर केली आहे.

मर्द पोलिसांच्या लाठ्या कुठे गायब झाल्या

तसेच माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणार साधला आहे. अनिल बोंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘४० हजार मुस्लिमांनी काल, शुक्रवारी मोर्चा काढला. कोणतेही दुकान असो, मेडिकलच्या दुकानदाराला बाहेर काढून ठोकलं. परंतु त्यावेळेला मर्द पोलिसांच्या लाठ्या कुठे गायब झाल्या होत्या. मर्द पोलीस कुठे गेले होते आणि आज अमरावती संपूर्ण दुकानं बंद आहे. उस्फुर्तपणे लोकं रस्त्यावर उतरले आहेत. तरुण बाहेर आलेला आहे. लोकं शांतपणे आंदोलन करतायत, तर पोलीस लाठ्या उगारत आहेत. काही मुसलमान पोरं आली त्यांनी तीन-चार दगडं मारली. त्याचं खापर या आंदोलनावर फोडलं जातंय. एक लक्षात ठेवा यापुढे मुस्लिम मोर्चा काढेल. आम्हाला पोलिसांच संरक्षण राहणार नाही, आम्ही आमचं संरक्षण करू, आमची पोरं मोर्चाच्या बाजूने राहतील. आता मोघलाई रजाशाही चालू देणार नाही.’

उद्धव ठाकरेचं हिंदुत्व सोनिया गांधी, शरद पवारांच्या ओंजळीतून पाणी पिणारे

पुढे अनिल बोंडे म्हणाले की, ‘शरद पवार, सोनिया गांधींच्या ओंजळीने पाणी पिणारं हे महाविकास आघाडीचं सरकार तीन-तीन ठिकाणी दंगल घडवून आणतंय. त्यामुळे पोलिसांनी संयम राखावं. आता मुसलमानांनी तलावारी काढल्या, आता कुठं पोलीस गेलं. या मुसलमानांना मस्ती आली आहे. आम्ही शांततेचं आवाहन करतोय पण जर मस्ती असेल तर आम्ही ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. मोर्चात शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेबांचा फोटो घेऊन आले, त्यांचे स्वागत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो घेऊन आले नाहीत. यांचं हिदुत्व सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या ओंजळीतून पाणी पिणार आहे. आम्हाला बाळासाहेबांचं हिंदुत्व चालतं, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतांचं हिंदुत्व चालत नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो आणला त्याचं स्वागत आहे.’


हेही वाचा – Maharashtra Protest: आंदोलन करणं हक्क असून त्यात हिंसा करणं चुकीचं; वसीम रिझवीच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचं काम – नवाब मलिक


 

First Published on: November 13, 2021 12:43 PM
Exit mobile version