मुंबई गिळंकृत केल्यावर कारवाईचे आदेश उशिरा सूचलेले शहाणपण, भातखळकरांची टीका

मुंबई गिळंकृत केल्यावर कारवाईचे आदेश उशिरा सूचलेले शहाणपण, भातखळकरांची टीका

मुंबई गिळंकृत केल्यावर कारवाईचे आदेश उशिरा सूचलेले शहाणपण, भातखळकरांची टीका

बेकायदा बाधकामांनी संपूर्ण मुंबई गिळंकृत केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर कठोर कारवाईचे आदेश देणे हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्याच्याच पक्षाची मुंबई महापालिकेवर गेली ३० वर्षे अव्याहतपणे सत्ता असताना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा हे सांगण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर येते याबद्दल ते आत्मचिंतन करणार का? असा सवाल करताना भातखळकर यांनी अन्यथा मुख्यमंत्र्यांचे आदेश म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असाच त्याचा अर्थ निघेल, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

अवैध बांधकामे, अनधिकृत झोपड्या, राडारोडा टाकत बुझवलेली तिवरांची जंगले अशा प्रकारे साऱ्या मुंबईचे विद्रुपीकरण झाल्यावर आता त्यासाठी जागाच उललेली नाही. मुंबईत सरकारी भूखंडावर, डोंगरावर, खाजण जमिनीत, पदपथावर जलवाहिन्यांवर अशी इंच आणि इंच जागा झोपडी माफियांनी बळकावली आहे. पाच मजल्या टोलेजंग झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत असलेले साटेलोटे हेच कारणीभूत असून वेळोवेळी शिवसेना नेतृत्वाने या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले, असा आरोपही त्यांनी केला.

गणपती विजर्सजनाच्या मिरवणुकीला, गरब्याला परवानगी न देता ईदच्या मिरवणुकीला परवानगी देणारे मुख्यमंत्री या अवैध बांधकामाचे तोडकाम करण्याची सुरूवात वांद्र्याच्या बेहरामपाड्यातून करणार का ?असा सवालही अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.


हेही वाचा : रश्मी शुक्लांना आरोपी बनवणार नसाल तर कोर्टाचा वेळ वाया घालवू नका, HCचा राज्य सरकारला सवाल


 

First Published on: October 21, 2021 9:22 PM
Exit mobile version