बाळासाहेब थोरात यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या अभिनंदनाच्या भाषणात भाजपसह बंडखोर आमदारांचा समाचार घेण्यात आला. यावेळी त्यांनी सतत गर्दीत राहणारे व्यक्तिमत्त्व तुमचे आहे. तुमचे भरपूर कौतुक व्हायला हवे. मात्र, तुम्हाला तुमचे चांगले कामचे तुम्हाला अडचणीत आणते आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना लगावला. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, आपली ज्येष्ठ मंडळी कोणत्याही पक्षाची असोत. त्यांना कायम आदराचे स्थान द्यायचे, लहानसहान माणसे मानाच्या पदावर नको ते बोलून जातात. या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातून अशी चुकीचे पायंडे पडता कामा नये असे थोरात यांनी आमदारांना आवाहन केले.
पुस्तके लिहिली जातील –
दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने आदर्शन काम केले आहे. एका पक्षाचे सरकार असले तरी कुरबुरी असतात, अडचणी असतात. त्याचबरोबर काम झाले पाहिजे. यासाठी किती आमदारांमध्ये तणाव असतो. हे सगळे माहिती आहे, असाही टोला बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात लगावला. महाविकसा आघाडीत कुणीह कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. हा बदल तुम्ही करत असताना तो एक नाव इतिहास नोंदवला जातो आहे. यावर कुणीह कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. हा बदल तुम्ही करत असताना तो एक नवा इतिहास नोंदवला जातो आहे. यावर पुस्तके लिहिली जातील, तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली. याचे वाईट वाटते अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष –
मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला, पर्यावरणवादी तिथे निर्णय घेतलाय, त्याचा तुम्हाला फेरविचार करावा लागेल असे आवाहन बाळासाहेब थोरातांनी केले. महाराष्ट्रात जुलैचा पहिला आठवडा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात पेरणीची अवस्था काय? पाऊस नाही. पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कर्जाची व्यवस्था नाही. या सगळ्या सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झाले आहे.