सरकारचे काम विरोधकांना पचनी पडत नाहीये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरकारचे काम विरोधकांना पचनी पडत नाहीये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकारने जी आश्वासने दिली होती, त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शिव भोजन, गिरणी कामगारांना घरे देण्यासारख्या योजना कमी कालावधीत मार्गी लागल्या आहेत. तरिही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत टीका केली आहे. विरोधकांना सरकारचे काम पचनी पडत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

 

First Published on: February 23, 2020 7:34 PM
Exit mobile version