भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, या भाषणानं शिक्कामोर्तब झालं आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राहुल गांधी यांच्यावर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील गटाध्यक्ष मेळाव्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांचा मेंदू गुळगुळीत आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली. त्यावर सचिन सावंतांनी प्रत्युत्तर दिले असून, एका दिशाभ्रम आणि बुद्धीभ्रम झालेल्या व्यक्तीचा आक्रास्ताळा विलाप याशिवाय दुसरी उपमा राज ठाकरेंच्या भाषणाला देता येणार नाही, असेही म्हटले. (Congress Leader Sachin Sawant Slams Raj Thackeray On Rahul Gandhi)
एका व्हिडीओच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. हा व्हिडीओ सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, “१६ वर्षात त्यांनी ज्या भूमिका बदलल्या त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. जनतेला त्या तर्कसंगत वाटत नाहीत. राजकीय यश मिळत नाहीत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते दुसऱ्यांवर आणि माध्यमांवर खापर फोडत आहेत. मनसेचं कार्य जनतेच्या विस्मृतीत जाण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचं ते म्हणतात. जनतेची स्मृती निर्धारित करता येऊ शकते हा जावई शोध त्यांनी लावला आहे”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जी यांच्या आजच्या भाषणावर व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया pic.twitter.com/0CFZhSYNJ3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 27, 2022
याशिवाय, “आम्ही राज ठाकरेंचा निषेध देखील करतो आणि त्यांच्या बद्दल दयाभाव आणि सहानुभूती ठेवतो, कारण दिशाभ्रम झालेल्या नेत्यांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे”, असं सचिन सावंत म्हणाले.
हेही वाचा – ‘यांच्या’ अंगावर एकतरी केस आहे का?, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका