Corona Update : चिंताजनक! राज्यात आज कोरोनामुळे सर्वाधिक ४२२ मृत्यू

Corona Update : चिंताजनक! राज्यात आज कोरोनामुळे सर्वाधिक ४२२ मृत्यू

Corona Update:

राज्यात आज दिवसभरात ११ हजार ११९ नवे कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून आज तब्बल ४२२ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आज कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आज ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडल्याने आतापर्यंत बाधितांचा आकडा ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचला आहे. तर २० हजार ६८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात ९,३५६ रुग्ण बरे होऊन घरी आले असून ४ लाख ३७ हजार ८७० जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.१४ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज ४२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने  सध्या राज्यातील मृत्यू दर ३.३६% एवढा आहेतर सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ६०८ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ३२,६४,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,१५,४७७ (१८.८५टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,७४९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,१७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


धक्कादायक! २०१२ मध्ये चीनच्या खाणीत आढळला होता कोरोनाचा विषाणू

First Published on: August 18, 2020 8:41 PM
Exit mobile version