या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली – देवेंद्र फडणवीस

या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली – देवेंद्र फडणवीस

राज्यसभे पाठोपाठ विधान परिषद निवडणूकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 5 वा उमेदवार विजयी केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विधान परिषदेच्या निवडणूकीत पाचही उमेदवार निवडूण आले आहेत, आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत आम्ही १२३ मते घेतली होती. आता १३४ मते घेतली आहेत असे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही आहे. त्यामुळे आमदारांनी आम्हाला मते दिलीअसे फडणवीसांनी म्हणाले.

लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच असंतोष थांबेल –

यावेळी बोलतान फडणवीसांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले, पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मते घेतली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आमचा संघर्ष जनतेसाठी –

पुढे त्यांनी  चमत्कार मी मानत नाही, असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झाला आहे. तो वाढत राहीला तर काय होऊ शकतो तेच या निकालाने दाखवून दिले, असे सांगीतले कोणाची किती मतं फुटली ते आम्हाला माहिती आहे, मी सगळ्या आमदारांचे आणि अपक्षांचे आभार मानतो ज्यांनी आमचे पाच उमेदवार निवडून आणले. आमचा संघर्ष जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

First Published on: June 20, 2022 11:26 PM
Exit mobile version