अहमदनगर-आष्टी रेल्वेच्या पाच डब्यांना भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

अहमदनगर-आष्टी रेल्वेच्या पाच डब्यांना भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

अहमदनगर : अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. यात रेल्वेच्या पहिल्या दोन डब्यांना लागलेली आगी आणखी पसरत पुढच्या पाच डब्यांपर्यंत गेली असून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची माहितीच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. पण या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आज दुपारी 3 वाजून 24 मिनिटाने अहमदनगर-आष्टी रेल्वेला शिराडोह परिसरा जळव आग लागली आहे. या गाडीतील प्रवाशांनी वेळीच खाली उतरल्याने त्यांचा जीव वाचला. ही आग सुरुवातीला दोन डब्यांना लागली होती. यानंतर ही आग पसरत पुढच्या तीन डब्यांपर्यंत पसरत गेली, अशी एकूण पाच डब्यांना आग लागल्याची माहिती रेल्वेने दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात अग्निशामन दला यश मिळाले आहे.

हेही वाचा – Meera Borwankar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार? मीरा बोरवणकरांचे पत्रकार परिषदेतून थेट आरोप

सीपीआरओ सेंट्रल रेल्वेच्या माहितीनुसार, 8 कोचच्या डीईएमयू रेल्वेला दुपारी तीन वाजताच्या सुमारास अहमदनगर आणि नारायणपूर स्टेशनदरम्यान आग लागली. ही आग लागताच प्रवाशी डब्यातून खाली उतरले. या आग लागलेल्या डब्यांत कोणताही प्रवासी नव्हते.

First Published on: October 16, 2023 6:25 PM
Exit mobile version