धक्कादायक! पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

धक्कादायक! पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सुखसागरच्या वाघजाईनगरमध्ये राहणाऱ्या या संपूर्ण कुटुंबाने आपलं जीवन संपवलं आहे. काल रात्री पुण्यातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अद्याप या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नसून या कुटुंबात दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा समावेश होता. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

या कुटुंबाचे अतुल दत्तात्रय शिंदे होते. अतुल शिंदे वय ३३, पत्नी जया शिंदे वय ३२, त्याच्या मुलगा ऋग्वेद वय ६ आणि मुलगी अंतरा ३ वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या दोन चिमुकल्यांना मारून त्यांनी गळफास दिला असण्याची शक्यता सांगितली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या घरातून कोणतीही हालचाल होत नव्हती. तसंच व्हाईट्सअॅप किंवा फोनवर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतं नव्हता. त्यामुळे याबाबत शेजाऱ्यांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. मग त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडला. तेव्हा घरात चौघांचे मृतदेह आढळून आले.

अतुल शिंदे हे ओळखपत्र तयार करून देण्याचे काम करत होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे त्यांच्या व्यवसाय बंद होता. त्यामुळे त्याने आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट सापडली नसल्यामुळे आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे तपासानंतरचं आत्यहत्येचं कारण स्पष्ट होईल.


हेही वाचा – धक्कदायक! चार महिन्याच्या गोंडस मुलीला झाडाखाली ठेवले आणि…


 

First Published on: June 19, 2020 8:31 AM
Exit mobile version