राज्यात भाजपची सत्ता असती तर महाराष्ट्र पेटवला असता

राज्यात भाजपची सत्ता असती तर महाराष्ट्र पेटवला असता

राज्यात भाजपची सत्ता असती तर महाराष्ट्र पेटवला असता - संजय सावंत

सीएए कायद्यावरुन राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रा शांत आहे. भाजपची सत्ता असती तर दिल्लीप्रमाणे मुंबईसुद्धा पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे, असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांनी ट्वीटरवरुन जय श्री रामच्या नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला टोला लगावला होता. संजय सावंत यांनी काही ओळी लिहत भाजपवर टीकास्त्र सोडले होते.

देता येत नाही तरुणांच्या हातांना काम, देतात घोषणा जोरात जय श्रीराम जय श्रीराम! हाती हवे ज्यांच्या पेन, पेन्सिल आणि पाठीवर दप्त ते गल्लीबोळात फिरतात घेऊन मशाली आणि पत्थर. घरात नाही पैसा अडका संपले सर्व दाणा-पाणी माय पुसे लेकाला बेटा पाह्य काम देतं का कोनी?

“पोरगा म्हणे काम तर मिळत नाय पण फिकर नाय
शोधतोय म्यां गद्दार पाकिस्तानी ते काम महत्त्वाचं हाय
मोदी म्हंत्यात तान भूक इसरा देशासाठी कष्ट भोगा
देशात त्यांना राह्यचं तर जय श्रीराम कहना होगा”, अशा आशयाचे ट्वीट केले होते.

माय म्हणे मोदींना सांग गरीबांवर असा काढू नका राग
त्यांचं आपलं एकच रगात गरीबांच्या पोटाला एकच आग
चला बोलू सगलेच आपन वंदेमातरम आनी जय श्रीराम
कमलवाल्यांनो किरपा करा द्या पोटाला भाकरी आनी हाताला काम

 

First Published on: March 3, 2020 6:42 PM
Exit mobile version