औरंगाबादमध्ये कारचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

औरंगाबादमध्ये कारचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर एका कारच्या भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जखमी झाले आहेत. महामार्गाजवळील कायगाव इथं शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास अपघात झाला आहे. मृतांमधील चौघेही पेशाने व्यावसायिक होते, अशी माहिती समोर येतेय. (major accident on gagnapur road kaygaon two cars collide 4 killed aurangabad)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने चालली होती, यावेळी चालकाला कायगाव इथल्या वळणाचा अंदाज न आल्यानं कार रोड डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला धडकली. यात कारमधील चौघे जण गंभीररित्या जखमी झाले. तर दुसऱ्या कारमधील देखील पाच जण जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तोवर खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी अपघातग्रस्त कारमधील चौघांना मृत घोषित केले. रावसाहेब मोटे, सुधीर पाटील, रतन बेडवाल आणि आणखी एकाचा यात मृत्यू झाला आहे. हे चौघही मित्र होते. ते प्लॉटिंगच्या व्यवसाय करत होते. ज्या कारला धडक बसली त्या कारमधील देखील चार जण जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु; 23 दिवसांत होणार 17 बैठका


First Published on: November 19, 2022 9:20 AM
Exit mobile version