राज्यात शिवजयंती साजरी करण्यावरून जोरदार राजकारण रंगलेले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसेने शिवजयंती साजरी करण्याचा मुद्द्यावर ठाकरे सरकारवर चांगलीच खिल्ली उडवली आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही, तर काय टिपु सुलतान जयंती साजरी करणार का ? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी कसली बंधने टाकत आहात ? असा सवाल मनसेकडून करण्यात आला आहे. अजान स्पर्धा भरविणारे, बारच्या वेळा वाढवून देणारे, निवडणुकांमध्ये कोरोनाची नियमावलीची पायमल्ली चालते अशा शब्दात मनसेने ठाकरे सरकारला टार्गेट केले आहे.
शिवजयंती हा आपला सण, ज्या छत्रपति शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करताना कसली बंधने टाकत आहात असा सवाल मनसेने केला आहे. त्यामुळे शिवजयंतीसाठीची नियमावली वेळीच बदला आणि जनतेला ग्राह्य धरू नका असा इशारा मनसेने दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही, तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ? असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर ?
शिवजयंती हा आपला वर्षा तील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार ची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती ला नियमावली.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 12, 2021
आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का? वेळीच हि नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका.@CMOMaharashtra ,@AnilDeshmukhNCP ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 12, 2021