मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर कारची कंटेनरला धडक

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर कारची कंटेनरला धडक

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनरवर पाठीमागून भरधाव येणारी अल्टो कार आदळल्याने कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.13) रात्री १० वाजेदरम्यान ट्रॅक्टर हाऊससमोर उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वसंत शंकर मांडोळे (वय ५७, रा. शिवपुरी चौक, उत्तम नगर, सिडको, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.कारमधून वसंत शंकर पाटील ( 55, रा. पाथर्डीफाटा), देविदास पाटील, रवींद्र पाटील, राजीव पाटील अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, कारमधून चौघे सख्खे भाऊ पारोळ्याहून नाशिकला येत होते. धुळे बाजूकडून नाशिककडे येताना महामार्गाच्या उड्डाणपुलावर एक कंटेनर नादुरुस्त झाल्याने उभा होता. रात्रीच्या अंधारात कंटेनर लक्षात न आल्याने अल्टो (एम.एच 15 एफएफ 9458) कार पाठीमागून जाऊन कंटेनरवर आदळली. कंटेनरला पाठीमागे रेडियम लावण्यात आले नसल्याचे व कंटेनरचे दिवेही बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे अल्टो कारचालकाला कंटेनरचा अंदाज आला नाही आणि कार कंटेनरवर जाऊन आदळली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढील तपस पोलीस नाईक रायते करत आहेत.

First Published on: November 14, 2021 3:35 PM
Exit mobile version