निफाड तालुक्यात पूल गेला वाहून

निफाड तालुक्यात पूल गेला वाहून

पूल गेला वाहून

सलग चार दिवसापासून नांदूर माध्यमेश्वर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे-ब्राह्मणवाडे या गावांना जोडला जाणार महत्वाचा रस्ता एका बाजूने पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे निफाड तालुक्याला जाण्यासाठी असलेला हा एकमेव पूल देखील वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.

काल रात्री पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने पुलावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते मात्र आज सकाळी पाण्याची पातळी थोडी कमी झाल्याने सदर पुल वाहून गेल्याचे गावकर्‍यांच्या निदर्शनास आले. हा पूल वाहून गेल्याने आता तालुक्याचा संपर्क पुर्णपणे तुटला असून तालुक्याला जाण्यासाठी आता कोणताही पर्यायी मार्ग नसल्याचे ग्रामस्थांनी संगितले.

First Published on: August 5, 2019 8:59 PM
Exit mobile version