कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडुन चळवळीत झोकुन द्यावे – रामदास आठवले

कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडुन चळवळीत झोकुन द्यावे – रामदास आठवले
आंबेडकरी चळवळ हि सामान्यांची आहे, कार्यकर्त्यांनी गटबाजी दुर करुन सर्वांनी या चळवळीत झोकुन द्यावे, सामाजिक चळवळीत अग्रस्थानी असलेल्या कार्यकर्ते अशा ज्वलंत कार्यकर्त्यांची भुमी नाशिकरोड हे या चळवळीचे केंद्र राहिलेले आहे, असे प्रतिपादन केन्द्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत माजी नगरसेवक सुनिल वाघ यांच्या शोकसभेत केले.
शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड येथे ना.आठवले यांनी वाघ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी आयोजित शोकसभेत बोलतांना आठवले म्हणाले की, पक्षाचे व चळवळीचे काम प्रामाणिकपणे काम करणा-या निष्ठावंत  कार्यकर्ते पाठीशी असल्यामुळेच रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोप-यात पोहचला आहे,  अशा कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मी दिल्लीत आहे, असेही ते म्हणाले.
First Published on: August 24, 2019 8:45 PM
Exit mobile version