कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात वीकेंड लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या घटत असल्यानं वीकेंड लॉकडाऊन हटवण्याची मागणी स्थानिक व्यापार्यांकडून केली जातेय. या मागणी बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मकता भूमिका घेतलीय. यापुढे शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दूकानं खुला करण्यास मान्यता द्यावी अशी सूचना आपण राज्या सरकारला केली असल्याची माहीती पालकमंत्री भुजबळांनी दिली. जिल्हाधिकारी कोरोना संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेतच दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तर मॉल्स, थिएटर्स अद्याप बंदच आहेत. त्यामुळे निर्बंध हटवण्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.