रानडुक्करांच्या हल्ल्यात एक ठार; दोन जखमी

रानडुक्करांच्या हल्ल्यात एक ठार; दोन जखमी

प्रातिनिधीक फोटो.

भात रोप तयार करण्यासाठी जमिनीची मशागत करत असताना मंगळवारी (दि.28) सायंकाळी 6 वाजेदरम्यान तीनजणांवर रानडुक्करांनी हल्ला केला. त्यात शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रवींद्र संपत पाडवी (20, रा.जातेगांव बु., ता. त्र्यंबकेश्वर) असे मृताचे नाव आहे. दीपक कृष्णा कनोजे (18, दोघेही रा. चिरापाली), पप्पू मधूकर भोये (30) अशी जखमींची नावे आहेत.

भात रोप तयार करण्यासाठी तिघेजण चिरापाली शिवारात जमिनीची मशागत करत होते. सायंकाळी 6 वाजेदरम्यान चिरापाली शिवारात रानडुक्करांनी तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात मौजे जातेगांव बु. येथील शेतकऱ्याचा मुलगा रवींद्र संपत पाडवी जागीच ठार झाला. तर शेतकरी दीपक कृष्णा कनोजे व पप्पू मधूकर भोये हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

First Published on: April 28, 2020 11:08 PM
Exit mobile version