राज्यातील काही जिल्ह्यांत सध्या दंगली उसळत आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी बळजबरीने मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेवर हिंदू महासभा चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरून बाह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून या घटनेची दखल घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात हिंदू महासभेने उडी घेतली असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू महासभेकडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारावर हिंदू संघटनेच्या वतीनं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे. याच महाद्वारातून इतर धर्मियांनी मंदिरात घुसण्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आज हिंदू महासभा आक्रमक झाला असून त्यांनी आज मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले आहे. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर प्रकरणी 72 तासांत कारवाई करा, अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
मागील काही दिवसात हे प्रकरण चर्चेत आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत तपासणी सुरू असून मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
हेही वाचा : दंगली घडवणारे खरे मास्टरमाइंड हे कलानगरमध्ये, नितेश राणेंचा हल्लाबोल