औरंगाबादमध्ये शिक्षक बनला सैतान; २१ मुलींचा केला लैंगिक छळ

औरंगाबादमध्ये शिक्षक बनला सैतान; २१ मुलींचा केला लैंगिक छळ

प्रातिनिधीक

औरंगाबादमधील जरंडी या गावातील शाळेच्या मुख्यध्यापकाने विद्यार्थींवर लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुख्याध्यापकाविरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे २१ पीडित विद्यार्थीनींनी जबाब नोंदवला आहे. या प्रकारानंतर मुख्यध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान, आरोपी मुख्यध्यापक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. हरिदास काटोले हे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत आरोपी मुख्याध्यापकाच्या पदावर कार्यरत होता.

मुख्याध्यापकाचे अश्लिल कृत्य 

गेल्या काही आठवड्यापासून मुख्याध्यापक विद्यार्थीनींसमोर अश्लिल भाषेचा वापर करुन बोलत होता. मुलींच्या डोक्यावरून हात फिरवणे, ओढणी व्यवस्थीत करण्याच्या बहाण्याने स्पर्श करणे, मुली बाथरुमला गेल्यावर त्यांच्या मागे जाणे, अशी अश्लिल कृत्य मुख्यध्यापक करत होता. मुलींनी हा सर्व प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांचा राग अनावर झाला. आक्रमक झालेल्या पालकांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापकाविरोधात तक्रार केली. त्यानंतर शिक्षक अधिकारी विजय दुतोंडें यांनी विद्यार्थीनींचा जबाब नोंदवून घेतला. या सर्व मुली सहावी ते आठवी या वर्गात शिकत होत्या.

First Published on: February 7, 2019 4:07 PM
Exit mobile version