गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात  60 लाख व्यक्तींना रोजगार!

गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात  60 लाख व्यक्तींना रोजगार!

राज्यात मागील ५ वर्षात १० लाख २७ हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे ६० लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये १ लाख ६५ हजार६२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी २५ टक्के रोजगार निर्मिती राज्यात झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मराठवाडा विभागात १ लाख ८ हजार ६७४ सुक्ष्म व लघु उद्योग स्थापन झाले. ज्यात, १७ हजार ६६३ कोटी रुपये गुंतवणूक व ५ लाख ८० हजार ५०७ रोजगार निर्मिती झाली. विदर्भ विभागात १ लाख ९४ हजार ४२० उद्योग स्थापन उभे झाले असून १८ हजार २३६ कोटी रुपये गुंतवणूक आणि ६ लाख ३७ हजार ४०९ रोजगार निर्मिती झाली आहे.

मेक इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र या दोन महत्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे  रोजगार निर्मितीला चालना मिळाली असून सामंजस्य करारापैकी कार्यान्वीत झालेल्या प्रकल्पांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
युवा उद्योजकांसाठी स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’चा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वंकष अशा या योजनेत  उद्योजकांवर पडणारा व्याजाचा भार कमी करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे ५० हजार युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. नव उद्यमींना सूक्ष्म व लघु उद्योग सुरु करण्यास सहाय्य व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारे व व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. असे उद्योग विकास आयुक्त तथा विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

First Published on: September 8, 2019 6:09 PM
Exit mobile version