राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले नाही आहेत. यापैकी एक म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन २ जूनपासून कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ जूनच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ८ जून सकाळी ७ वाजेपर्यंत रत्नागिरीत कडक लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू असतील. तसेच इतर दुकाने पुर्णतः बंद राहतील. महत्त्वाचे म्हणजे दूध आणि किराणा मालाची फक्त सेवा सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू असणार आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये काय सुरू असणार आणि काय बंद असणार जाणून घ्या
रत्नागिरी जिल्ह्यात काय बंद काय सुरू?
- इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांना प्रवेश करण्यास बंदी
- इतर जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी
- नातेवाईकांचे अंत्यसंस्कार किंवा उपचारासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्याची आणि इतर जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी
- पण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांकडे ४८ तासाअगोदर केलेल्या कोरोना चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे
- शेतीसंबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील
- मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने नाहीत. फक्त दुकानापर्यंत माल वितरण करणेपुरती मालवाहतुक मर्यादित राहिल.
- थेट ग्राहकाला माल देताना येणार नाही
- जर मालवाहतुकदाराने या नियमांचे उल्लंघन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईलपर्यंत त्याच्यावर बंदी घालण्यात येईल.
हेही वाचा – मुंबईत अत्यावश्यक सेवेची दुकाने २ वाजेपर्यंत खुली